मुंबईतील शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील शिक्षक व पालक राहणार उपस्थित प्रमोद पाटील केळवे वार्ताहर ता.28 मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर बुधवार (28) पासून सुरू झालेल्या शिक्षणाच्या वारीत पालघर जिल्हयातील सुमारे 125 शिक्षक आणि 125 शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य येत्या शुक्रवारी (ता. 30) उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासात शिक्षक-पालक दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती ही मुख्यत्वेकरून पालकांचे प्रतिनिधित्व करते. शाळा व्यवस्थापन समिती हा घटक सक्षम झाल्यास शाळा विकासात लोकसमुदायाचा सहभाग अधिक वाढेल. त्यातून शिक्षक-पालक सुसंवाद निर्माण होईल आणि 100 % विद्यार्थी प्रगत करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या उद्देशाने गुणवत्ता विकासासाठी शालेय व्यवस्थापन समित्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी यावर्षीची ‘शिक्षणाची वारी’ मुंबई येथे आयोजित केली आहे. ‘शिक्षणाची वारी’चे यंदाचे चौथे वर्ष आहे. आतापर्यंत आयोजित केलेल्या शिक्षणाच्या वारीमध्ये सुमारे लाखभ...