Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

हरेश्वर पाटील:, प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व

हरेश्वर पाटील, प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व          ३८ वर्षे सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केल्यानंतर ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्था लालोंडे संचलित स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री. हरेश्वर शिवराम पाटील हे आज ३० जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.       शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून निवृत्त होताना चेहऱ्यावर निश्चित समाधान असते. आपल्या आयुष्याची हीच खरी शिदोरी असते. सेवा निवृत्तीचा दिवस हा प्रत्येकासाठी एक अनमोल दिवस असतो.         पालघर तालुक्यातील सागावे येथील श्री. हरेश्वर शिवराम पाटील यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण घेऊन चरितार्थासाठी आपल्याच भागातील लालोंडे येथील विद्यालयात १९८३ मध्ये  नोकरी स्वीकारली. त्या काळामध्ये शासकीय-निमशासकीय नोकरी मिळणं तसे फार कठीणच होते. मात्र त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा आणि आणि काम करण्याची जिद्द यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. आपली नोकरी करत असतानाच समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेव...

पालघर येथील गुरुकुल समूह तरुणांना आदर्शवत....

पालघर येथील गुरुकुल समूह तरुणांना आदर्शवत           आजच्या या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया संपूर्ण जगातील सर्वात मोठे संप्रेषणाचे माध्यम बनले आहे. किंबहुना सोशल मिडीया मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून पालघर येथील गुरुकुल समूहाने तरुणांपुढे  एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.        1 ऑगस्ट 2014 रोजी राज्यातील छत्तिसावा जिल्हा म्हणून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. विशेषतः या जिल्ह्याची रचना नागरी, सागरी आणि डोंगरी अशी असल्याने इतर जिल्ह्यांपेक्षा हा एक वेगळा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन गुरुकुल व्हाट्सअप ग्रुप सुरू केले आहेत. आज  गुरुकुल चे तीन व्हाट्सअप व एक फेसबुक ग्रुप असून सोशल मीडियामध्ये गुरुकुल ग्रुपने एक वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे.           गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधत आहेत. सोशल मीडियाशिवाय आपल्या जीवनाची कल्पना देखील करू शक...