“प्रामाणिकतेची ठेवली शिदोरी, कार्याचा घेतला आनंद गोड, शिक्षकांच्या प्रश्नांत धावले पुढे, सेवेला दिला आयुष्यभर ओघ ओघ!” शिक्षक संघटनेचे कार्य म्हणजे केवळ मागण्या मांडणे नव्हे; तर शिक्षकांच्या भावना, प्रशासनाचा दृष्टिकोन आणि शिक्षणव्यवस्थेची गरज यांच्यामध्ये संवेदनशील पूल बांधणे. ही नाजूक आणि जबाबदारीची भूमिका माननीय चिंतामण ठाकूर सरांनी अतिशय तळमळीने, संयमाने आणि प्रामाणिकतेने पार पाडली. “Leadership is not about titles or positions — it’s about impact, influence, and inspiration.” ही इंग्रजी ओळ जणू ठाकूर सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे प्रतिबिंबच आहे.पालघर–ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी संघटनेतील प्रत्येक सदस्याला स्वतःच्या कुटुंबाचा एक भाग मानले. शिक्षकांची एखादी अडचण आली की कार्यालयापर्यंत जाऊन ती सोडवण्याची तयारी हेच त्यांचे खरे परिचयपत्र ठरले. मला त्यांच्यासोबत अनेक आंदोलनांत सहभागी होण्याचा, विविध सभा-संमेलनांना हजर राहण्याचा योग आला. त्या प्रत्येक क्षणी त्यांचा शांत स्वभाव, दूरदृष्टी आणि सतत जागृत लेखणी माझ्यासा...