Skip to main content

हरेश्वर पाटील:, प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व

हरेश्वर पाटील, प्रामाणिक आणि संयमी व्यक्तिमत्व 

        ३८ वर्षे सेवेत प्रदीर्घकाळ प्रामाणिकपणे काम केल्यानंतर ग्रामीण विभाग श्रमिक शिक्षण संस्था लालोंडे संचलित स्वर्गीय विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील शिक्षकेतर कर्मचारी श्री. हरेश्वर शिवराम पाटील हे आज ३० जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
      शासकीय किंवा निमशासकीय सेवेतून निवृत्त होताना चेहऱ्यावर निश्चित समाधान असते. आपल्या आयुष्याची हीच खरी शिदोरी असते. सेवा निवृत्तीचा दिवस हा प्रत्येकासाठी एक अनमोल दिवस असतो.
        पालघर तालुक्यातील सागावे येथील श्री. हरेश्वर शिवराम पाटील यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून आपले शिक्षण घेऊन चरितार्थासाठी आपल्याच भागातील लालोंडे येथील विद्यालयात १९८३ मध्ये  नोकरी स्वीकारली. त्या काळामध्ये शासकीय-निमशासकीय नोकरी मिळणं तसे फार कठीणच होते. मात्र त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिकपणा आणि आणि काम करण्याची जिद्द यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकून घेतली. आपली नोकरी करत असतानाच समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाण ठेवून  त्यांनी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या कार्यामध्ये  उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी युवक मंडळाचे चिटणीस म्हणून यशस्वीरीतीने धुरा सांभाळली.
    त्यांचे कामासाठी असलेले समर्पण खरोखरच  प्रशंसनीय होते. मी आशा करतो की निवृत्ती काळात त्यांच्या आयुष्यात आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहील हीच अपेक्षा.
        शेवटी एवढंच... 
नवे क्षितीज, नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची पहाट,
हे स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर सदैव राहो,
तुमच्या पाठिशी हजारो सूर्य तळपत राहो,
 आपणास सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
- प्रमोद पाटील, पालघर

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...