Skip to main content

समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक

    समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी:, डॉ. दीपक चौधरी यांचे प्रतिपादन, लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्षपदी ॲड. तारानाथ वर्तक
 पालघर...
         कोरोनाच्या जागतिक आपत्तीमुळे सामान्य माणूस खचला असून या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब अहोरात्र झटत असून स्वतःची काळजी घेत समाजाची सेवा करण्याची हीच खरी संधी आहे असे भावनिक मत पास्ट डिस्टिक गव्हर्नर डॉक्टर दीपक चौधरी यांनी व्यक्त केले.
             सफाळे लायन्स क्लबच्या 2020-2021 वर्षासाठी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ रविवारी (तारीख 26) ऑनलाइन पद्धतीने झाला. या पदग्रहण समारंभाचे प्रमुख अधिकारी म्हणून डॉ.चौधरी बोलत होते. राज्यावर कोसळलेल्या संकटामुळे सामान्य माणूस पुरा खचला आहे. या सामान्य माणसाला उभा करण्यासाठी लायन्स क्लब च्या माध्यमातून पन्नास लाखांचा प्रकल्प उभा करून मुंबईतील डबेवाल्यांना तसेच मावळ तालुक्यात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तेथील आपद्ग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत कार्य करण्यात आले. भविष्यातही लायन्स क्लब कोरोनाच्या लढाईत पुढे राहील असे आश्वस्त करून नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
       लायन्स क्लब ऑफ सफाळे अध्यक्ष म्हणून ॲड. तारानाथ वर्तक, सेक्रेटरी दिनकर वर्तक, उपाध्यक्षपदी नितीन वर्तक व विकास वर्तक, सहसेक्रेटरी महेंद्र नांगरे, खजिनदारपदी मनोज म्हात्रे तर सहखजिनदारपदी प्रमोद पाटील यांनी पदग्रहण केले. 
            यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या डिस्टिक गव्हर्नर शशिकांत मोड यांनी शेतकरी हा ग्रामीण विकासाचा शिल्पकार असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जानेवारी महिन्यामध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्याचे प्रयोजन असून दात्यांनी शेतकऱ्यांना दत्तक घेऊन या उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले. विशेष निमंत्रित पास्ट डिस्टिक गव्हर्नर प्रशांत पाटील यांनी भविष्यात ग्रामीण भागातील शाळांसाठी मास्क, सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणात गरज लागणार असून ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृतीची खरी गरज असल्याचे मत व्यक्त केले. वाईस डिस्टिक गव्हर्नर डॉ.ख्वाजा मुद्दतसर यांनी 210 देशांपेक्षा अधिक देशांमध्ये सुरू असलेल्या लायन्स क्लबमध्ये 13 लाख 60 हजार सभासद असून भारतात 2 लाख 80 हजार सभासद असल्याचे सांगून नवीन सभासदांना शपथ दिली. याप्रसंगी चंद्रशेखर घाग, हेमंत सेठीया आदी मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
         नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.तारानाथ वर्तक यांनी करसोंडे व सफाळे येथील आदिवासी पाड्यांमध्ये विजेची सुविधा उपलब्ध करून देणे, एडवण येथील मच्छी मार्केट मध्ये पाण्याची टाकी व सॅनिटायझर बसवणे, विविध उपक्रमांसाठी निधी उभा करणे आदी कामांसाठी प्राधान्य दिले जाणार असून लवकरच आपल्या परिसरातून कोरोनाला हाकलून लावू असा दृढ निश्चय व्यक्त केला.
           क्लबचे माजी अध्यक्ष हरीश ठाकूर यांनी प्रास्ताविक केले तर माजी सेक्रेटरी नंदकुमार वर्तक यांनी आपल्या कारकिर्दीतील इतिवृत्त सादर केले. क्लबचे माजी खजिनदार जयवंत वर्तक यांनी जमाखर्चाचा आढावा घेतला. यावेळी विविध समित्यांचे प्रमुख आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरची सुद्धा घोषणा करण्यात आली. निधी संकलन प्रमुख म्हणून अशोक म्हात्रे, सर्विस चार्जपर्सन भालचंद्र चौधरी, मेंबरशिप चेअर पर्सन नंदकुमार वर्तक, मार्केटिंग कम्युनिकेशन चेअर पर्सन सतिष घरत, लायन्स क्लब समन्वयक दिलीप पाटील, टॅमर म्हणून सचिन वर्तक, टेल ट्विस्टर राजय चौधरी आदींची निवड करण्यात आली. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून दामोदर पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र किणी, कमळाकर चौधरी, जगदिश ठाकूर, 
शरदकुमार शिंदे, अनंत वर्तक, नरेश पाटील, जयवंत  वर्तक, हरेश्वर वर्तक, कमळाकर एस पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन व स्वागत गीत ऋत्वी पाटील व हार्दिका पटेल यांनी गाऊन उप8स्थितांची वाहवा मिळवली. ध्वज वंदन सहखजिनदार प्रमोद पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी दिनकर वर्तक यांनी केले. 
      कार्यक्रमाच्या प्रारंभीच सफाळे लायन्स क्लबचे  फाउंडर मेंबर्स अशोक चौधरी, विजय घासवाला 

व ज्ञात-अज्ञात दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. या पदग्रहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सराफ यांनी केले. यावेळी लायन्स क्लब चे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 - लायन प्रमोद पाटील
       सहखजिनदार
 लायन्स क्लब ऑफ सफाळे 
9049052555

Comments

  1. Nice drafting Pramod patil sir

    ReplyDelete
  2. Patil Sir, very nice write-up. Covered all points. Very well.

    ReplyDelete
  3. Well drafted and nice write up.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...