Skip to main content

लॉक डाऊन नंतरच्या शालेय शिक्षणात क्रीडा शिक्षकांचे अनन्यसाधारण महत्त्व, आमदार कपिल पाटील

पालघर, प्रमोद पाटील
      लॉकडाऊन नंतरच्या शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षणाचे महत्व व शारीरिक शिक्षण शिक्षकाची भूमिका या संदर्भात महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाने सहयोगी शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनांच्या मदतीने राज्यातील सातही विभागाचे शिक्षक आमदार व पदवीधर आमदारांसोबत ऑनलाईन बैठकीचे रविवार (ता. 24 ) आयोजन करण्यात आले होते.
        क्रीडा शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत शिक्षक आमदारानी मार्गदर्शन करताना म्हटले की, बदलत्या तंत्रशिक्षणाच्या युगात व कोरोनानंतर विद्यार्थ्यांची शारीरिक सुदृढता महत्वाची असून शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढ करण्याचे काम क्रीडा शिक्षकांच्या माध्यमातून होणार असल्याचे मत कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी मांडले. कोरोनानंतर शाळा उघडल्यावर विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांची संख्या वाढवावी लागेल. याबाबतीत दोन दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत एक सभा झाली असल्याचे असे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले. संचमान्यतेत शारीरिक शिक्षण शिक्षकास घेण्यास प्रथम प्राधान्य देऊ असे आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगितले. संचमान्यता व त्यासंबंधी शासन निर्णय रद्द होण्याची गरज आमदार नागो गाणार यांनी सांगितली . शारीरिक शिक्षण भरती, संच मान्यता, 6 ते 8 चा शारीरिक शिक्षणाचा कार्यभार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संबंधी आमदार विक्रम काळे, आमदार किशोर दराडे, आमदार डॉ
. सुधीर तांबे, आमदार श्रीकांत देशमुख यांनी परखड विचार मांडून शिक्षण मंत्र्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले .
      या बैठकीत राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, विश्वनाथ पाटोळे, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य,  माधुरी चेंडके, प्राचार्य गोरक्षनाथ पारगावकर, डॉ. पुरुषोत्तम उपर्वट, आनंद पवार, राजेश जाधव, डॉ. अरूण खोडस्कर या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रश्नाची जाणीव सभेस करून देत विद्यार्थ्यांच्या प्रतिकारक्षमता वाढीसाठी शाळे वेळेव्यतिरीक्तही अतिरीक्त काम करण्याची तयारी दर्शविली. या बैठकीस राज्यातील एक हजार शारीरिक शिक्षण शिक्षक, पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, राज्य आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी उपस्थित होते. 
       या बैठकीच्या नियोजनासाठी प्रमोद पाटील, जितेंद्र लिंबकर, सचिन पाटील, दिनेश भालेराव, सचिन देशमुख, राजेश जाधव, आनंद पवार यांनी मेहनत घेतली.
         या बैठकीस राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अ. नगर, शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समिती,  माध्य. व उच्च माध्य. शा. शि. महामंडळ, क्रीडा विकास परिषद,  क्रीडा संघर्ष समिती, क्रीडाभारती, मुंबई महानगर शा. शि. शिक्षक युनीट, शा. शि. विषय बचाव व कृती समिती, शा. शि. व क्रीडा विषय समिती व सर्व सहयोगी संघटनाचे सदस्य हजर होते. शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषयाला या सभेमुळे विशेष महत्त्व प्राप्त होण्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली.
 चौकटीत-
 गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटक राज्यातील शालेय शिक्षणाचे वेळापत्रक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या वेळापत्रकामध्ये शारीरिक शिक्षणाच्या व कला विषयाच्या तासिका कमी करण्यात आल्या होत्या. जर असेच वेळापत्रक राज्यात लागू केले तर अनेक क्रीडा व कला शिक्षक अतिरिक्त होतील. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणात शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांच्या अहर्तेचा उल्लेख नसल्याने राज्यातील कला व क्रीडा शिक्षक कमालीचे हैराण झाले आहेत. रविवारी झालेल्या ऑनलाईन मीटिंगमध्ये सुमारे एक हजार पेक्षा जास्त शारीरिक शिक्षण शिक्षकांनी उपस्थिती लावून ऐतिहासिक सहभाग घेतला.
 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...