Skip to main content

इंडोनेशिया येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन

 येथील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कॉन्फरन्समध्ये राज्यातील शिक्षकांनी घडविले भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन    


पालघर-


      महाराष्ट्र राज्यातील सुमारे 30 उपक्रमशील शिक्षक, मुख्याध्यापक व नृत्य कलाकार विद्यार्थ्यांनी इंडोनेशिया देशातील बाली येथे शुक्रवारी (ता. 22) झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्समध्ये आपले विविध कौशल्य दाखवून भारतीय तिरंगा इंडोनेशियामध्ये अभिमानाने फडकविला.


     जागतिक पर्यटनाचे  केंद्र असलेल्या बाली येथील कुता(बडुंग) एसएमपीएन या ठिकाणी संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व सांस्कृतिक कॉन्फरन्स मध्ये राज्यातील शिक्षकांनी आपल्याकडील शोधनिबंध व विविध  कौशल्य सादर केले. यामध्ये पालघर जिल्हयातील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांनी भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती या विषयावर पाॅवर पाॅईंट प्रझेंटेशन करून जगात भारतीय संस्कृती किती महत्वाची आहे हे विशद करून भारतीय प्राचीन व आधुनिक  शिक्षण पद्धती यांची एकमेकांशी असलेले संबंध स्पष्ट केले. तसेच भारतातील विद्यमान शिक्षण पद्धतीचे सादरीकरण केले. तर पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा स्व. विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील प्रगती पाटील यांनी परंपरागत कठपुतलीच्या शोमध्ये  सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. 

 तसेच या परिषदेत आपल्याकडील कला संस्कृतीचे दर्शन डोंबिवलीतील नृत्यम संस्थेच्या संचालिका भरत नाट्यम विशारद स्वप्ना देशपांडे, इद़धनू आर्ट अॅकेडमीच्या किर्ती निर्गुण व सहकारी  तर रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण येथील नृत्य मल्हार कथक अॅकेडमीच्या कथक नृत्याविशारद स्कंधा (आर्या) चितळे व चिपळूण तेथील शाळा व महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांनींनी रामायण व इतर विविध कार्यक्रमांच्या अप्रतिम सादरीकरणाबरोबरच डोंबिवलीच्या मुख्याध्यापिका कल्पना गवरे यांनी परंपरागत कठपुतलीच्या शो आणि शिक्षण तज्ञ  मारूती गोंधळी यांनी वेगवेगळे आवाज काढून उपस्थितांची वाहवा मिळवली. 


       राज्यातील शिक्षकांनी 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या दरम्यान इंडोनेशियातील वेगवेगळ्या शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून इंडोनेशियामधील शैक्षणिक, अध्यापन पद्धती समजून घेतली. तसेच आपल्याकडील शैक्षणिक पद्धती आणि विचारांचे आदान प्रदान केले.


           इंडोनेशिया मधील बाली हे बेट पर्यटनाच्या दृष्टीने सुप्रसिद्ध आहे. रामायणाची आणि महाभारताची पार्श्वभूमी व संस्कृती या बाली बेटाला आहे. त्याकाळातील संस्कृती आणि परंपरा आजही येथे जोपासली जात आहे. अनेक हिंदू मंदिरे या ठिकाणी असून तसेच बाली हे नाव रामायणा मुळे पडले आहे. बाली हा सुग्रीवाचा भाऊ आपण रामायणामध्ये ऐकलेले  आहे.या रामायणाचे प्रयोग येथे सुरू असून राज्यातील शिक्षकांनी हे प्रयोग पाहिले.    


          या परिषदेला पालघर जिल्हयातील विराथन येथील अभिनव विद्यालयातील शिक्षक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका तथा विद्या विनोद अधिकारी विद्यालय लालोंडे येथील प्रगती पाटील उपस्थित राहून कठपुतलींवर आधारित पारंपरिक सांस्कृतिक  कार्यक्रमात सहभागी झाले होते.

      तसेच कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक मारूती गोंधळी, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सहसचिव ज्ञानेश्वर म्हात्रे, क्रॉसवेचे इंटरनॅशनलचे संचालक दिलिप ठाणेकर, सिनेकलाकार स्वप्निल फडके, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पवार, रमेश जाधव, बाळासाहेब सोनजे, काशीनाथ भोईर, प्रकाश घोडके, लालचंद पाटील, स्नेहलता झेले आदी मान्यवर उपस्थित होते.


चौकटीत-


इंडोनेशिया येथील शैक्षणिक परिषदेत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी  पुढीलप्रमाणे सादरीकरण केले.


1) प्रमोद पाटील (पालघर)- भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धती.


2) उज्ज्वला जगताप( पुणे) - कृतीयुक्त अध्यापन पध्दती


3) प्रधान कुलकर्णी ( ठाणे)- गणितीय गंमती जमती


4) अनिल माळी( नाशिक)- भारतीय पक्षी संवर्धन 


5)  संजय जगताप ( पुणे)-  आय एस ओ स्कूल संकल्पना 


6) सलमा अंसारी (भिवंडी)- शालेय गुणवत्ता विकास 


7)सुनिल आहेर( नाशिक)- प्लास्टीक प्रदुषण   


8) ज्योती तांबे ( पुणे) - आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा वापर   


9) चंदाराणी कुसेकर( ठाणे)-ज्ञानरचनावाद


10) कल्पना गवरे ( डोंबिवली)-  कठपुतली शो


11) मनिषा हिवरे ( कसारा)- साहित्यातून शिक्षण 




 


"प्रतिक्रिया"-


 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत परदेशातील शिक्षण प्रणाली समजून घेण्यासाठी राज्याचे तत्कालिन शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या संकल्पनेतून परदेशात जाऊन तेथील शिक्षण पद्धती समजावून घेऊन राज्याच्या शैक्षणिक पद्धतीत नवनवीन उपक्रम राबवून राज्याची शिक्षण पद्धती अधिक गतीमान करण्यासाठी निश्चितच अशा परिषदा उपयुक्त ठरतील. शासनाने अशा परिषदांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. 


- प्रमोद पाटील,  पालघर 


राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक 



 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...