Skip to main content

सफाळयातील विराथन बुद्रुक शाळेचे शतक; पालकांनी व्यक्त केली शाळेविषयी कृतज्ञता !

सफाळयातील विराथन बुद्रुक शाळेचे शतक; पालकांनी व्यक्त केलं शाळेविषयी प्रेम!

प्रमोद पाटील 


केळवे वार्ताहर ता.13

  ज्या शाळेत आपण शिकलो तेथे आता आपली मुलं, नातवंडे शिक्षण घेत आहेत.या शाळेने आता शतक गाठले. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे अशा भावना पालकांनी व्यक्त करीत शाळेविषयी आपली कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त केलं. या वेळी बरयाच जणांना आपल्या भावना आवरणेही कठीण झाले होते.  

    सफाळे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या विराथन बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेचा शतक महोत्सवी सोहळा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने  बुधवारी (ता.13) मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. 


        13 मार्च 1919 रोजी तत्काळीन परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन या जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थापना करण्यात आली.विराथन, विठ्ठलवाडी, चिखलपाडा, जलसार आदी गावांतील विद्यार्थ्यांसाठी विराथन बुद्रुक येथे ही गटशाळा सुरू करण्यात आली.इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या शाळेत परिसरातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असत. समुहगान, वत्कृत्व आणि क्रीडा स्पर्धांमध्ये या शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष मजल मारली असून शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. 

        सद्या या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात 54 विद्यार्थी शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून विद्यार्थी येथे दाखल होत आहेत असे येथील प्रमुख शिक्षक प्रशांत तरे व सुनिल भरसट यांनी सांगितले. 

      शतक महोत्सवाचे औचित्य साधून या शाळेत काम केलेल्या शिक्षकांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकु आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी परिसरातील सर्वात जेष्ठ शिक्षक नारायण कारभारी होते.   

   या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल किणी,सरपंच शरद घरत,  केंद्र प्रमुख लुसी डिसोझा, डाॅ.अरूण घरत ,जयवंत महाराज, चंद्रकांत साने, विनायक किणी, दिनकर घरत, प्रदिप घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष जाधव यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले. तर आयकर अधिकारी ज्योती जाधव आणि अजंली किणी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाळेचे असंख्य आजी माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... प्रमोद पाटील

बदलतं काश्मीर... बहरतं काश्मीर... - शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील          अगदीच लहानपणापासून आजतागायत मनामध्ये प्रचंड आकर्षण असलेले पण त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी कधीच जाऊ शकणार नाही, ते ठिकाण आपण बघू शकणार नाही अशी सातत्याने भीती वाटत असलेले ठिकाण म्हणजेच काश्मीर. खरंतर भारताचे नंदनवन, पृथ्वीवरील स्वर्ग, सोनेरी मुकुट अशी अनेक विशेषणं ज्या ठिकाणाला कमी पडतील अशा काश्मीरला जाण्याचा योग मात्र आला.       आम्ही पालघर येथील मुक्ताई परिवाराने ११ एप्रिल ते २० एप्रिल असा दहा दिवसांचा काश्मीर दौरा केला. आज पर्यंत काश्मीर बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीचं वाचलं होतं. ऐकलं होतं. तसेच सोशल मीडियावर पाहिलं सुद्धा होतं. अशा या काश्मीरला भेट देतांना मनामध्ये प्रचंड उत्साहाबरोबरच थोडी भीतीची  झालर सुद्धा होतीच. कारण यापूर्वी पर्यटक म्हणून गेलेल्या काही पर्यटकां कडून काही कटू अनुभव सुद्धा ऐकले होते. त्यातच संपूर्ण कुटुंबासह काश्मीरला जाणे म्हणजेच आपण काही धोका तर पत्करत नाही ना ? अशी शंका मनामध्ये येऊन गेली. मात्र आतापर्यंत मनात असलेल्या भीतीचे रू...

समाज माध्यमांचा विधायक वापर, पालघर मधील गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समुहाचं आदर्शवत कार्य -------------------------------------------------

शालेय अभ्यासक्रमात पुस्तकातून जी गोष्ट, जे संस्कार कदाचित विद्यार्थ्यांच्या बाल मनावर बिंबविता येत नसतील तेच संस्कार आपल्या दैनंदिन व्यवहारातून, आचरणातून सहजगत्या दुसऱ्या व्यक्तीवर, विद्यार्थ्यांच्या बालमनावर प्रतिबिंबित करता येतात.     खरंतर, बालवयापासून आपले आई-वडील, आजी-आजोबा, कुटुंबातील मोठ्या व्यक्ती तसेच शाळेतील शिक्षक आपल्याला जे संस्कार करतात किंवा चांगले वागण्यास भाग पडतात त्यालाच मूल्यशिक्षण असे म्हणतात. या मूल्य शिक्षणाने एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार व्हाव म्हणून प्रयत्न केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीला मुल्यशिक्षणाची गरज असून ते शिक्षण मिळणे आवश्यकच आहे.          सध्याच्या युगात समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर तसेच समाजातील प्रत्येक घटकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. या समाज माध्यमांचा जर योग्य विधायक दृष्टिकोनातून वापर केला तर निश्चितच समाजाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो.            पालघर जिल्ह्यातील गुरुकुल शिक्षक समुहाने समाज माध्यमाचा सकारात्मक वापर केल्याने एका गरजू शिक्षकाच्या पत्नीच्या उपचारासाठी आर्...

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी

निसर्गरम्य मालवणमध्ये बहरणार 'विशू'ची प्रेमकहाणी  प्रमोद पाटील, पालघर प्रतिनिधी  काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या मयूर मयूर मधुकर शिंदे दिग्दर्शित 'विशू' या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक डायलॉग होता. ‘ये मालवण कहा आया? त्यावर 'विशू' म्हणतो, यहा दिल में...  या एका डायलॉगने अनेक कोकणवासीयांसह अनेकांची मने जिंकली. कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्रकिनारे, तिथली साधी भोळी माणसे, प्राचीन मंदिरे, तिथली संस्कृती, परंपरा  या सगळ्याचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले हे मालवण 'विशू' चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेकदा चित्रीकरणासाठी महाराष्ट्राबाहेरील आणि परदेशातील बेटांचा विचार केला जातो. परंतु आपल्या महाराष्ट्रातही खूप सुंदर बेटं आहेत, याचा आपल्याला अनेकदा विसर पडतो. त्यापैकीच एका सुंदर बेटाचे दर्शन आपल्याला 'विशू' पाहिल्यावर घडणार आहे.    'विशू'चे काही चित्रीकरण कोकणातील एका बेटावर करण्यात आले आहे. चित्रपटात सुंदर दिसणाऱ्या या बेटावर चित्रीकरण करणे तसे आव्हानात्मक होते. एकतर या बेटावर मोबाईलचे नेटव...